मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजकीयच गोष्टी सांगितल्या जातात...
औरंगजेबाशी युद्ध, अफजलखानाचा कोथळा, शाहीस्तेखानाची बोटे, आग्र्याहून सुटका इ इ.
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतात :
१. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी हे खरे "सामाजिक क्रांतीकारक" होते !
२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये, हा आदेश देणारे "लोकपालक राजे" होते !
३. हातात तलवारीबरोबर पट्टी घेऊन जमीन मोजून नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते !
४. विना कारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते !
५. समुद्रप्रवास करण्यास हिंदूधर्मात बंदी होती, तो विरोध पत्करून आरमार उभे केले. धर्मापेक्षा देशहीत मोठे हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते !
६. अमावस्येच्या रात्री लढाया करून त्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे सुधारक" होते हे नक्की !
त्यांनी ३५० वर्षांपूर्वी सुरु केलेली पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे त्यावरून ते नक्कीच *आधुनिक विचारसरणीचे* होते, हे नक्की !

Comments
Post a Comment