Posts

पंच भूमिका प्रामाणिक असावी

Image
 

धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची बॉक्सिंग खेळाची प्रचार-प्रसार संदर्भात बैठक संपन्न.

Image
 

जय कवळी यांना निलंबन करण्याचा आदेश रद्द.

Image
मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती सुश्री रेवती मोहिते डेरे आणि सुश्री नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या बॉक्सिंगच्या भारतीय महासंघाचे प्रमुख संस्थापक आणि माजी सरचिटणीस श्री. जय कवळी यांच्याविरुद्धचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा आणि त्यांच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालावरून केलेल्या निलंबनचा आदेश रद्द केला ! या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेता न्यायमूर्तीने असे नमूद केले की ८ जानेवारी २०२२ रोजीच्या विवाद आणि शिस्तपालन आयोगाचे निष्कर्ष आणि शिफारशी रद्द करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही ! " कार्यकारिणीने १० जानेवारी २०२२ च्या बैठकीत निलंबनाशी संबंधित ठराव पारित केला होता. फेडरेशन आणि त्याच्या संलग्न युनिटमधील कोणत्याही बॉक्सिंग क्रियाकल्पांपासून याचिकाकर्ते आणि त्यांना त्यानुसार बाजूला ठेवले गेले होते. शेवटी खंडपीठाने असेही जोडले की, " निर्णय सुनावल्यानंतर, प्रतिवादी फेडरेशनच्या ( BFI ) च्या वकिलांनी आज दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. आदेशात नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांची...

"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"

Image
"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी" धुळे - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समस्त नारी शक्तीला आमच्या क्रीडा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याचं अनुषंगाने माझा आजचा लेख नारी शक्तीला समर्पित असेल,खरंतर प्रत्येक दिवस हा नारी शक्तीचा असायला हवा कारण तिच्या सारखं सामर्थ्य हे आज कोणाकडेच नाही,ती प्रत्येक क्षेत्रात पारंगत राहत तिच्या बलाढ्य अशा आत्मविश्वासामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास हा प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच तिला तिच्या जीवनातील सामर्थ्याचे संपूर्ण स्वतंत्र हवं,विशेष म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेत सक्षम असल्याने "चूल आणि मूल" ही पडद्याआड संस्कृती बाजूला ठेवून तिचा आदर आपल्या समाजाने केला पाहिजे तेव्हाच 'नारी शक्तीचा जागर' खऱ्या अर्थाने होईल,आजही आपला समाज लिंगामुळे तिच्या कार्याला कमी लेखतो आणि हिचं बाब आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते खरंतर घर व समाज यांच्या विकासाच्या बाबतीत पुरुष व स्त्री या दोघांचे समान योगदान असतं तरी पण आपण ती महिला आहे म्हणून तिला पाहिजे तसं स्वतंत्र देऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्...

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२)

Image
"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२) आपण सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी या लेख मालिकेच्या भाग १ मध्ये सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली आणि यावरुनचं आपल्याला असं लक्षात येतं की शालेय स्तरावरील 'सर्वांगीण विकास' हा मुलांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्वाला एक यशस्वीतेचा आकार देण्याचे कार्य नियमितपणे करत असतो म्हणून शालेय स्तरावर आकार देणाऱ्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया ही प्रभावी असायला हवी,खरंतर ज्याप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण हा देशाच्या शिक्षणविषयक इतिहासामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे,त्याचंप्रमाणे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत 'सर्वांगीण विकास' हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे,सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा एक व्यापक दृष्टीकोन आहे,शिक्षण हे जीवनाभिमुख असून जीवनाची पूर्वतयारी शिक्षण असल्याने शालेय स्तरावरील वयोगट ३ ते ७, ८ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मुलभूत हालचालींचा विकास व कारक कौशल्याचा विकास हा उत्तमरित्या होत असल्यामुळे शारीरिक,मानसिक क्षमतेसह बौद्धिक,भावनिक व सामाजिक आदी मुल्यांचा विकास ...

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१)

Image
  "सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१) धुळे - २१ व्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विज्ञान युगात जर आपल्या मुलांना सुदृढ,निरोगी आयुष्यासह व आनंदी जीवनशैलीसह यशस्वी बनवायचं असेल तर त्यांचा 'सर्वांगीण विकास'होणं हे फार गरजेचं आहे आणि तो शारीरीक,मानसिक,बौद्धिक, भावनिक,सामाजिक,आध्यामिक व व्यावसायिक अशा सप्तरंगाच्या घटकांवर अवलंबून आहे,त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने होणं हे आजच्या आधुनिक युगासाठी फार महत्वाचं असेल पण ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी माध्यम कोणतं असावं..? असा जर प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत असेल तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण शालेय प्राथमिक/माध्यमिक स्तरावर राबविण्यात येणारा अभ्यासक्रम हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेचं असतो त्यात वरील सर्व घटक हे अंतर्भूत असतात, तरी पण सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ओरड का..? हा ही एक प्रश्न आहेच, मग आपल्याला थोडं राज्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की विद्यार्थ...

‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️

Image
 ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ "मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी सुध्दा प्रयत्न करायला हवा." 📚⚽🚩🖋️🏆🥇 (- भरत कोळी, शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे)         "परीक्षेच्या दृष्टीने मुलांना वाचन संस्कृतीकडे नेण्याची नितांत गरज आहे,कारण आजच्या वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पेपर लिहितांना बऱ्याच अडचणी मुलांना येतात,वाचतांना देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे प्रश्न समजत नाही, खरंतर आजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्याचा रसच दिसत नाही अशी परिस्थिती शालेय स्तरावर आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालावर येत असतो आणि पालकांची ओरड होते की शिक्षक लक्ष देत नाही, शिकवत नाही,खेळांमुळे मार्क कमी मिळाले,अभ्यासाचे नुकसान झाले अशी काही परिस्थिती बघायला मिळते,खरंतर खेळांचा आणि परीक्षेचा जवळचा संबंध आहे खेळ मुलांचा ताणतणाव दूर करण्यास विशेष भुमिका पार पाडतो, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते मग खेळामुळे कसे काय मार्क कमी पडू शकतात..? हा मला पडलेला प्रश...